रविवार, २४ एप्रिल, २०१६

शाश्वत ऊपाय !


विकासगंगेच  फसव चित्र  थंडीतच  कोरड्या  पडलेल्या  नळांनी   ऊघड  केल्यानंतर  ह्यापुढे  तरी  आपले - परके ,   खर्या - खोट्यातला  फरक  ओळखुन  दुर्लक्षित झालेल्या  आड , नद्या ,  ओढ्यांची  म्हणजेच  आपल्या   जीवनदायी  जलस्त्रोतांची  काकुळतीची  हाक  ऐकुन  त्यांची  दुरावस्था  दूर  करण्याचे प्रयत्न  व्हायला  हवेत.  त्यासाठी  नद्या - ओढ्यांना  नासवणारे  प्रदुषण  आणि    नद्यांसकट  धरण , बंधारे , तलावांचे   अस्तित्वच  बुजवायला  निघालेला  गाळ  तसेच  गाव - शहरातील  भुजलाची  दुरावस्था  आणि  खालावलेली  पातळी  ह्या  आजच्या  विदारक  परिस्थितीविरोधात  आपल्यातले  सर्वप्रकारचे  भेदाभेद   विसरून  समाजातल्या  सर्व  स्तरातल्या  लोकांनी  एकत्र  येऊन  ऋतुमानाप्रमाणे  " नेमेची  येऊन "  दुष्काळात  स्वार्थाचा  सुकाळ  आणणार्या  ह्या  अवर्षणाच्या  दुश्चक्राला  कायमस्वरूपी   हद्दपार  करण्याचे  अथक  शाश्वत  प्रयत्न  केले   पाहिजेत  आणि  केवळ  त्यानंतरच  ह्या  दुष्काळामागे   दडलेल्या  भस्मासुरांना  जरब  बसेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा